सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

तेजस्वि नावधीतमस्तु..!

त्यावेळी त्यांच वय होता अवघा ३० वर्षे आणी ब्रिटिश सरकारने त्यांना ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली वर्ष १९११ पासून ते १९६० पर्यंत.
तसा पाहता कुठलीही सामान्य व्यक्ति हे ऐकताच कोलमडून पडली असती पण हा मनुष्य भर कोर्टात म्हणतो Are you sure British will rule India upto 1960?
इतका धाडस की ज्यांनी आपल्या नाकावर टिच्चुन १५० वर्ष राज्य केला त्यांच्या साम्राज्याच्या अस्तित्वावर हा माणूस थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आणी १९४७ ला भारत स्वातंत्र्य होतो तसा पाहता हा माणूस जिंकला म्हणायला हरकत नाही पण स्वातंत्र्य भारतच दुर्दैव की आम्हा भारतीयांना हा स्वातंत्र्यवीर कधी समजून घ्यावाच वाटलाच नाही, आधी एका धर्माचा शिलेदार म्हणून आमच्या इतिहासाने त्याला हिणवला आणी त्यात भर म्हणजे स्वांतंत्र्य मिळाल्यावर ही त्यांच्या घरच्यांना त्यांच्या सम्पत्तिची मालकी मिळवून देण्यात पण आमच सरकार अपयशी ठरला सगळंच दुर्दैव तसा पाहता.
पण...हा माणूस हरला नाही ते म्हणतात ना सूर्याला कधी ग्रहण लागत नसता तर तो पाहणाऱ्या च्या नजरेचा दोष असतो काहीसं तसच ह्या माणसाबाबत म्हणावं लागेल.
अंदमानातल्या त्या खोलीत शिक्षा सहन करत असताना ही ह्या माणसाच् देशप्रेम तिळमात्र कमी झाला नाही आणी तिथे सुद्धा ह्या माणसाने कितीतरी अजरामर काव्य लिहिली.
"ने मजसी ने परत मातृभुमिला सागरा प्राण तळमळला" ह्या कवितेतून पहिल्यांदा सावरकर शाळेत ओळखीचे झाली आणी त्यानंतर जन्मठेप समजली.
ताश्कंद करारात शास्त्रीजी सोबत फसवणूक होणार ह्याचा दाखला ह्या मुत्सद्दी माणसाने आधीच दिला होता पण दुर्दैव इथे पण सोबतीला आला आणी ताश्कंद मधे जे घडला त्याला जग साक्ष होता.
पु ल एकदा त्यांच्यावर भाषण करतांना म्हंटले होते की "ज्या खोलीत साक्षात तेजच वस्तीला येता तिचा गाभारा होतो"
(अंदमानातल्या खोलीबद्दल बोलताना ).
त्यांनी "६ सोनेरी पाने" लिहिली पण वास्तविकता अशी आहे की ह्या तेजस्वी मनुष्याने लिहिलेल प्रत्येक पान सोनेरी आहे, 
कुशाग्र बुद्धिमत्ता,  राजकारण आणी इतिहासाचा गाढ़ा अभ्यास, आणी तितकंच व्यासंगी लिखाण ह्यांचा समेट जिथे घडून येतो त्या व्यक्तीच नाव विनायक  
दामोदर सावरकर.

तेजस्वि नावधीतमस्तु..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा